Headlines

केंद्र सरकारची आयुष्यमान भारत योजना सुरू; 15 हजारांहून कमी पगार असणारे कामगारांना योजनेचा लाभ

आयुष्यमान भारत योजना:- ई- श्रम पोर्टलवर नोंदणी करावी लागणार. 15000 पेक्षा कमी उत्पन्न असणारे कामगार ह्या पोर्टलवर नोंदणी करू शकणार आहेत.

आयुष्यमान भारत योजना:- तुमचं मासिक उत्पन्न 15000 पेक्षा कमी असेल आणि तुम्ही असंघटित कामगार असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. तुम्ही ई- श्रम पोर्टलवर तुमची नोंदणी करू शकता. यामुळे कोणतीही दुर्घटना आणि  आजारपणादरम्यान  येणाऱ्या खर्चाच्या चिंते पासून मुक्त होऊ शकता.  ई- श्रम पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर कोणत्याही प्रकारचा अपघात झाल्यास कामगारांना दोन लाखांचा विमा मिळणार आहे. तसेच कुटुंबासाठी वार्षिक पाच लाख रुपये पर्यंतचे आरोग्य सुरक्षा कवच देणाऱ्या आयुष्यमान योजनेत समावेश होतो.

आयुष्यमान भारत योजनेच्या कोणत्याही मदतीसाठी हेल्पलाईन नंबर 144 34 वर संपर्क साधू शकतात. तसेच पोर्टल www.gms.eshram.gov.in मार्फत कोणतीही तक्रार दाखल करू शकतो. असंघटित कामगारांमध्ये बांधकाम कामगार,घर काम, करणारे कामगार,रिक्षाचालक, फेरीवाले,स्थलांतरित आणि प्लॅटफॉर्म कामगार,कृषि कामगार,मनरेगा कामगार, इत्यादीचा समावेश होतो. परंतु यांचे मासिक उत्पन्न पंधरा हजार रुपयांहून कमी असणे गरजेचे आहे.

कोण करू शकतो नोंदणी?

  • असे कामगार,ज्यांचे वय 16 ते 59 वर्षे आहे आणि कर्मचारी भविष्य निर्वाह संस्था किंवा राज्य विमा महामंडळ जे या सुविधांचे लाभार्थी नाहीत.
  • असे कामगार,जे आयकर भरण्यासाठी पात्र नाही.
  • असे कामगार,जे सरकारी कर्मचारी नाहीत.

कशी कराल नोंदणी?

जर तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक असेल, तर तुम्ही स्वतः नोंदणी करू शकता. यासाठी ई- श्रम पोर्टल www.eshram.gov.in वर भेट द्यावी लागेल. तसेच ज्यांच्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक नाही, त्यांना नोंदणी करण्यासाठी सीएससी सेंटर ला जावे लागेल. अशा कामगारांची नोंदणी बायोमेट्रिक पद्धतीने केली जाईल. ई- श्रम कार्डला सीएससी सेंटर कडून कागदावर प्रिंट करून कामगारांना दिले जाईल.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *