भारतासारखा खंडप्राय, शेतीप्रधान देश, नवीन वर्षाच्या अर्थव्यवस्थेसाठी जणू बीज रोवत असतो, अशावेळी त्याला राष्ट्रीययीकृत बँका, तसेच सहकारी सोसायट्यांकडून त्याला पिककर्ज देतात.सहकारी सोसायट्यांना जिल्हा बँका bank loan पत पुरवठा करतात. हे पिककर्ज Crop Loan कसं असतं पाहा…
शेतकऱ्यांसाठी पिककर्ज Crop Loan हे सर्वात कमी दिवसात परतफेड करण्यासाठी दिलेलं कर्ज असतं, किमान १२ महिन्यांच्या आत पिककर्जाची Crop Loan परतफेड करावी लागते. शेतकऱ्यांनी ३१ मार्चपूर्वी ही परतफेड केली, तरच तुम्हाला सरकारकडून व्याजात दिली जाणारी सूट लागू होते, वेळेवर कर्ज भरल्यानंतर सरकारने दिलेली व्याजातली सूट लगेच मिळत नाही. मिळालेली सूट ही काही दिवसांनी तुमच्या बँक खात्याला जमा होते.
पिककर्ज Crop Loan शेतकऱ्यांना दिलं जात असलं, तरी ३ लाखांपेक्षा कमी कर्ज Crop Loan घेणारे, आणि (वेगवेगळ्या बँकांच्या bank loan नियमानुसार, बहुतेक वेळा ३१ मार्चच्या आत) १२ महिन्यांच्या आत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाच यात सूट दिली जाते, तुमच्याकडे १०० एकर जमीन असो किंवा १० एकर, तरीही तुम्हाला ३ लाखांच्या पिककर्जासाठीच व्याजात सूट दिली जाते.
मात्र तुम्ही ३१ मार्च किंवा १२ महिन्यांपेक्षा जास्त कालावधी घेतल्यास, तुम्हाला नियमित व्याजदर लावण्यात येतो, शहरी लोकांना सोप्या भाषेत सांगायचं तर, होमलोनला असतो, तेवढा व्याजदर अशावेळी पिककर्जाला Crop Loan सुरू होतो, दुष्काळासारखी परिस्थिती आल्यास, किंवा खूप चांगलं पिक आलं आणि झालेल्या खर्च उत्पन्नाएवढाच आले, आणि शेतकऱ्याने हे कर्ज वेळेवर न भरल्यास, या व्याजदराखाली या कर्जाचा डोंगरच उभा राहतो, असं म्हणता येईल.
वेळेवर तेही ३ लाखांच्या आत कर्ज घेणाऱ्यांनाच, व्याजदरात सूट दिली जाते, यावरून जास्त जमीन असलेले शेतकरी खूप कर्ज काढतात आणि कर्जमाफी मागतात, असं जर कुणी बोलत असेल तर अभ्यास न करता बोलणारा हा व्यक्ती असल्याचं समजा.
राष्ट्रीयीकृत बँकांकडून दिलेलं पिककर्ज Crop Loan वेळेवर न भरल्यास, पिककर्ज दुप्पट किंवा त्यापेक्षा जास्त होवू शकतं, मात्र गावातील विकास सोसायटीमार्फत एखाद्या शेतकऱ्याने कर्ज घेतलं आणि थकवलं, थकल्यानंतर व्याज हे रकमेएवढं झालं, तर हा आकडा तिथल्या तिथे थांबतो, विकास सोसायटीतून घेतलेलं कर्ज थकलं, तर ते घेतलेल्या रकमेच्या दुप्पटी Crop Loan एवढंच वसूल करता येतं.