मृत्युपत्र न करता मयत (Land Record) झालेल्या व्यक्तीचा कायदेशीर वारस कोण किंवा सात किंवा अधिक वर्षे परागंदा असलेल्या व्यक्तीचा कायदेशीर वारस (Land Record) कोण याबाबत संभ्रम असल्यास दिवाणी न्यायालयाकडून वारस दाखला (Succession Certificate) मिळवावा लागतो.
यासाठी (Land Record) मयत व्यक्तीच्या कायदेशीर वारसाने (Succession Certificate) संबंधित दिवाणी (Land Record) न्यायालयात दावा दाखल करावा. दाव्यात, दावा करणार्याचे नाव, पत्ता, रेशन कार्ड पॅन कार्ड, मयत व्यक्तीशी असलेले नाते, मयत व्यक्तीचे अन्य वारस आणि त्यांचे पत्ते, पॅन कार्डस्, रेशन कार्ड, वंशावळ, मयताचा मृत्यू दाखला आणि मयत व्यक्तीच्या नावावर असलेली सर्व स्थावर व जंगम मालमत्ता (Land Record) यांचा तपशील नमुद असावा.
अर्जावर कोर्ट फी अधिनियम, १८७० अन्वये आवश्यक ती (Land Record) कोर्ट फी अदा करावी. दावा दाखल झाल्यानंतर, न्यायालय ४५ दिवस मुदतीची नोटीस वर्तमान पत्रात प्रसिध्द करते. जर त्याबाबत कोणाचीही तक्रार (Land Record) प्राप्त झाली नाही तर वादीच्या नावे वारस दाखला दिला जातो. या सर्व प्रक्रियेला अंदाजे ५ ते ७ महिन्यांचा कालावधी लागतो.
अधिकृत रीत्या वारस प्रमाणपत्र देण्याचा अधिकार फक्त न्यायालयाला (Land Record) आहे. ग्रामीण स्तरावर ग्रामसेवक किंवा तलाठी यांच्याकडून वारस प्रमाण (Land Record) पत्र घेतले जाते परंतु ते अनधिकृत आहे. ग्रामसेवक व तलाठी यांना वारस प्रमाणपत्र देण्याचा कुठलाही अधिकार नाही.