महिनाभरात पिक विमा ची नुकसान भरपाई मिळणार.

पुणे:- अतिवृष्टी बाधित पिक विमा नुकसान भरपाई शेतकऱ्यांना महिनाभरात मिळणार आहे. राज्य सरकारने 973 कोटी रुपये पहिला हप्ता जमा केल्यानंतर आता केंद्र सरकारी लवकरच 900 कोटी रुपये विमा कंपनीकडे जमा करणार असून त्यामुळे कंपन्यांना आत पैसे आदा करावेच लागतील.

हे हि वाचा :-पी एम किसान योजनेचे दहाव्या हप्त्याचे पैसे हवे असतील तर कागदपत्रांमधील या त्रुटी दुरुस्त करा

मराठवाडा विदर्भ या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकरी अडचणीत आला होता. विमा कंपन्यांकडे शेतकऱ्यांनी 72 तासाच्या आत मध्ये ऑनलाईन पद्धतीने तक्रारी करून देखील आतापर्यंत विमा कंपन्यांनी एक रुपया पण शेतकऱ्याला दिलेला नाही. राज्य शासनाने 973 कोटी रुपयांचा पहिला हप्ता विमा कंपन्यांना दिला होता परंतु केंद्र सरकारकडून कडून मिळणारा हप्ता नियमाप्रमाणे कंपनीने मागणी करणे गरजेचे असते. परंतु विमा कंपन्यांना मिळणाऱ्या व्याजामुळे सदरची मागणी कंपनीने  केंद्र सरकारकडे केली नव्हती.

कृषी आयुक्तालयाच्या  सततच्या पाठपुराव्यामुळे आता सर्व कंपन्यांनी केंद्राकडे मागणी केली आहे. त्यामुळे साधारण महिनाभरात त्यातही काही जणांना दिवाळीपूर्वी  नुकसान भरपाई मिळणे अपेक्षित आहे. ऑनलाइन पद्धतीने दाखल झालेले 33 लाख पूर्वसूचना पैकी वीस लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्याच्या पिकाचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. उर्वरित पंचनामे कृषी खात्याकडून युद्ध स्तरावर करण्यात येत आहेत.

केंद्र सरकारकडे सर्व कंपन्यांनी बिले (एकूण मागणी) जमा केली असून,रकमेची मागणी केली आहे ते पैसे विनाविलंब मिळतात. पंचनामे होऊन ज्या शेतकऱ्याची नुकसान भरपाईची रक्कम निश्चित झालेले आहे त्यांना पैसे मिळण्यात आता काही अडचण नाही.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top