आता आधार कार्ड नाही तर हा पुरावा महत्वाचा

काय होईल फायदा
काय आहे नवीन नियम ?
आता पुढील महिन्यापासून जन्म दाखल्याविषयी नियम लागू करण्यात आला आहे. त्यामुळे जन्म दाखल्याचे महत्व पुन्हा वाढणार आहे. 1 ऑक्टोबरपासून जन्म दाखल हेच एकमेव कागदपत्र वापरता येणार आहे. केंद्र सरकारने मान्सून सत्रात हे बिल मंजूर केले होते. बुधवारी केंद्रीय गृहमंत्रालयाने त्याची अधिसूचना काढली. हा नियम लागू झाल्यानंतर दुसऱ्या कोणत्याही कागदपत्राची गरज पडणार नाही. जन्म दाखल हाच पुरावा ग्राह्य धरण्यात येईल. जन्म दाखल्या आधाराचे तुमची कामे होतील. शाळेत प्रवेश, वाहतूक परवाना, पासपोर्ट आणि आधार कार्ड तयार करण्यासह इतर अनेक कामांसाठी ओळखीचा पुरावा म्हणून जन्म दाखला सादर करावा लागेल. मुलांचा जन्म दाखला आई-वडिलांच्या आधार कार्डशी जोडण्यात येईल.
डेटा बेस तयार करणार :-
केंद्र सरकार सरकारी आणि खासगी दवाखान्यातून याविषयीचा डेटा जमा करणार आहे. त्यामुळे त्याचा वापर करता येईल. मान्सून सत्रात दोन्ही सदनात, लोकसभा आणि राज्यसभेत हे बिल मंजूर करण्यात आले होते. रजिस्ट्रेशन ऑफ बर्थ अँड डेथ (अमेंडमेंट) बिल 2023 हे बिल मंजूर करण्यात आले होते.
काय होईल बदल :- New Rules On Aadhaar
रुग्णालयात नागरिकाचा मृत्यू झाल्यास मृत्यू प्रमाणपत्र द्यावे लागेल. नवीन नियमानुसार रजिस्ट्रारला जन्म आणि मृत्यूची मोफत नोंद करावी लागेल. गेल्या सात दिवसात प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. रजिस्ट्रारच्या कामावर नाराज असाल तर त्याविरोधात तक्रार करता येईल. 30 दिवसात अपील दाखल करता येईल. रजिस्ट्रारला 90 दिवसात उत्तर दाखल करावे लागेल.